![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/12/Picsart_22-12-27_07-04-45-039-716x1024.jpg)
आजी/माजी डबेवाला कामगारांना मुंबईत घरे मिळालीच पाहीजे
मुंबई:
गेली १३० वर्ष मुंबईत जेवणाचे डबे पोहचवणारा डबेवाला आर्थिक क्षमता नसल्यामुळे मुंबईत आपले हक्काचे घर घेऊ शकला नाही. त्या मुळे बहुतांश डबेवाल्यांना मुंबईत आपले स्व:ताचे घर नाही. बरेचसे डबेवाले हे झोपडपट्टीत, भाड्याच्या खोलीत,गावकीच्या खोलीत, मंडळाच्या खोलीत रहात आहेत. या आजी/माजी डबेवाल्यांना सरकारने परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली पाहीजेत , अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनची आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले की,” आपल्या मेहनितीच्या व चिकाटीच्या जोरावर डबेवाल्यांचा गैर सरकारी व्यवसाय अजुन ही मराठी माणसांच्या हातात आहे.
आजी/माजी डबेवाले ही सेवा गेली १३० वर्षे अविरतपणे देत आहे. हा डबेवाला कामगार मुंबईच्या बाहेर घालवायचा नसेलतर आजी/माजी डबेवाला कामगाराला मुंबई मध्ये परवडणार्या दरात घर उपल्ब्द करून दिले पाहीजे. तरच तो मुंबई शहरात ठिकुन राहू शकतो.
डबेवाल्यांना मुंबई मध्ये हक्काचे घर मिळाले पाहीजे. या साठी २००४ साला पासून सरकार दरबारी सतत मागणी करण्यात येत आहे. तात्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीत डबेवाल्यांना घरबांधणी साठी भुखंड देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
त्या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख व तात्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्वासन वेळो वेळी डबेवाल्यांना दिले. तात्कालीन उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहीजे या बाबत मंत्रालयात बैठकी घेतल्या होत्या.
डबेवाल्यांना आशा होती की म.वि.आ. सरकारच्या कालावधीत डबेवाल्यांचा घरांचा प्रश्न नक्की मार्गी लागेल व डबेवाल्यांना मुंबईत हक्काचे घर मिळेल.
परंतु ते सरकार कोसळले आणी नविन शिंदे सरकार अस्तित्वात आले नविन मुख्यमंत्री यांचे कामाचा आवाका मोठा आहे त्या मुळे डबेवाल्यांना आशा आहे की विद्यमान मुख्यमंत्री डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडवतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची विनंती आहे की डबेवाला कामगार यांचे मासिक उत्पन्न तुटपुंजे आहे “अती अल्प उत्पन्न” गटा पेक्षाही त्याचे मासिक उत्पन्न कमी आहे. तेव्हा त्यांना परवडणार्या दरात म्हणजे पाच/ सहा लाखात मुंबईत घरे उपलब्द करून दिली पाहीजे,आणी ते पैसे भरण्यासाठी बॅन्केतून सुलभ हप्त्यावर गृहकर्ज उपलब्द करून दिले पाहीजे. जर असे झाले तर डबेवाल्यांचे मुंबईत आपले स्व:ताच्या हक्काचे घराचे स्वप्न साकार होईल.
या मुंबईत माथाडी कामगार यांना घरे मिळाली, गिरणी कामगार यांना ही घरे मिळाली मग डबेवाला कामगारांना ही मुंबईत घर मिळाली पाहीजेत अशी आमची डबेवाले कामगारांची मागणी आहे.
- शिक्षणाचा दर्जा न संभाळणा-या शिक्षकाला सेवेतून कमी करणार: दिपक केसरकर
- विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
- नूतनचे प्रा.दीपक पाटील यांना डॉक्टरेट
- शिवदुर्ग टीमचे प्रशासनाकडून कौतुक
- अतिवृष्टी असलेल्या भागातील शाळांना सुट्टी
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/12/PicsArt_01-17-12.45.53-20.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/12/Picsart_22-11-05_10-52-40-099-12-717x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/12/Picsart_22-09-02_21-12-10-302-45-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2022/12/Picsart_22-10-23_17-08-56-367-8-1024x728.jpg)