कार्ला – विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व आदर्श व्यक्तिमत्त्व  तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडविण्याचा व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात म्हणून शिक्षकदिनी त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत संस्था आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने संस्थेतील सर्व शाळा व कॉलेजमध्ये जाऊन तेथील ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर संस्काराचे धडे देणे गरजेचे असून ती जबाबदारी शिक्षकांवर आहे यावेळी बोलताना सोनबा गोपाळे म्हणाले की,देशाच्या जडणघडणीत शिक्षकाचे योगदान मोठे असून शिक्षकांवर असलेली विश्वासार्हता लक्षात घेऊन देशाच्या संविधानात्मक राष्ट्रपती देऊन देशहितासाठी योगदान देण्याचा मान मिळाला.
यावेळी संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, संस्थेचे संचालक व एकवीरा विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा,प्रगती विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे  उपस्थितीत होते.

error: Content is protected !!