कामशेत:
कामशेत येथील पाली तीर्थ यात्रा कमिटीच्या वतीने इंद्रायणी नदी ची स्वच्छता आणि संवर्धनासाठी  शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

शहरातील १००हून  अधिक महिला , युवती व युवक जनजागृती रॅली मध्ये सहभागी झाले होते.रॅली नंतर वाडिवळे येथील संगमेश्वर तीरावर नदीचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेतली.

संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणात ह.भ.प. गणेश महाराज जांभळे यांनी नदी चे अध्यात्मिक महत्व सांगीतले.रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे माजी अध्यक्ष सचिन काळभोर यांनी नदी विषयीची सविस्तर माहीती देत आपण ती कशी स्वच्छ ठेऊ शकतो,यात महिलांची भूमिका कशी असावी? माता भगीनीची भूमिका किती महत्वाची हे विशद केले.

एक महिला जलसाक्षर झाली, तर संपूर्ण कुटुंब जल साक्षर होईल हा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन पर भाषणात काळभोर यांनी नदी स्वच्छता व संवर्धन या बाबत लहान सहान पण महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या.

इंद्रायणी नदी बाबतची कृतज्ञता व्यक्त करताना खणा नारळाने ओटी भरून दिवे अर्पण करण्यात आले,  आरती झाली. व नदी स्वच्छेतेची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.या साठी पाली तिर्थ यात्रा कमिटी चे संस्थापक पोपट बाफना, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, यांच्या संकल्पनेतून नदी कृतज्ञता सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी भोजन व्यवस्था संघवी अशोक मोडालाल गदिया यांनी केली होती.या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे,संपर्क प्रमुख लासूरकर, राजूशेठ बेदमुथ्था,दत्ताशेठ रावते,प्रवीण पवार,बाळासाहेब दुबे, विनायक वाघवले ,ॠतुध्वज घोलप,गोविंद कदम,सुनील गायकवाड, संजय गरूड,बेबी बाफना,माजी सरपंच सारीका घोलप,मिना बालगुडे,प्रभा दाभाडे,संगीता वाघवले,कविता मावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!