
वडगाव मावळ: मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.आंद्रा,पवना,इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे.तर आंद्रा,जाधववाडी,ठोकळवाडी,शिरोता,सोमवडी,वाडिवळे,पवनासह अन्य धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.
आंदर मावळ,नाणे मावळ,पवन मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावरील धबधबे वाहू लागले आहे.
भात खाचरात पाणी वाढल्याने भात लावणीच्या कामाचा वेग मंदावला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने वयस्कर मंडळी शेकोटीचा आधार घेत आहे.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग,खेड्या पाडयांना जोडणा-या रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे.वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.तर निसर्गाचे रौद्ररूप मावळकर अनुभवत आहे.पावसाच्या चर्चा होत आहे.ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी होत आहे.काही ठिकाणी झाडे झुडपे उन्मळून पडली आहेत.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश




