
कर्तुत्व- एक सामाजिक अपेक्षा ( भाग -१)
कर्तुत्व या शब्दाला अनेक छटा आहेत .अनेक रंग आहेत,उपजत आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या मनाच्या भावभावनांचा आपल्या कृतीतून होणारा अविष्कार म्हणजे कर्तृत्व होय .
कर्तुत्व हा शब्द चांगल्या कृतीसाठी वापरला जातो मग ती वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल ,राष्ट्रीय पातळीवर असेल, समाजाला पूर्ण विकसित झालेलं आपलं कर्तृत्व केव्हा दिसतं हा तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न आहे.
याचा शोध घेण्याचा जरा आपण प्रयत्न केला तर त्याच्या मुळाशी दडलेल्या अनेक पूर्तीचा आपला परिचय होईल यात शंका नाही.
आपलं कर्तृत्व गाजवणाऱ्या आणि त्यामुळे नावारूपाला येणारी सर्वांच्या स्मरणात राहणारी व्यक्ती कलेचे उपासक, कष्टकरी, अभ्यासू ,अनुभवी आणि त्यागी वृत्तीचे असावी लागते, त्याशिवाय त्या व्यक्तीकडून अतुलनीय कार्य घडू शकत नाही आणि असं कार्य घडल्याशिवाय ती कर्तुत्वान म्हणून घडू शकत नाही.
आपलं कर्तव्य पार पाडत असताना नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगी असावे लागतात म्हणजेच कष्टाच्या जंगलात बिंदास घुसणे, उपक्रमांचा गालिचा सतत विणणे, सर्वांना बरोबर घेऊन चालले अशी भूमिका त्या व्यक्तीला घ्यावी लागते.
सर्वांचे नेतृत्व करत असताना त्यांना कार्यप्रवृत्त करणे सुद्धा तेवढच महत्त्वाचे आहे.
तरच भरीव असं कार्य घडतं आणि कर्तृत्व दिसून येतं .
राष्ट्रीय पातळीवरती स्वातंत्र्यपूर्व काळात या सर्व वरील विवेचन यांचे दर्शन आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या चरित्रातून घडतं. मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर ,लोकमान्य टिळक , असो राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असो.
या सर्वांचे कर्तुत्व इतके मोठे आहे की त्यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांना आपण सलाम करतो, नतमस्तक होतो, कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी सत्कर्माची आवश्यकता असते. सत्कर्म करण्यासाठी उत्तम संस्काराची आवश्यकता असते. उत्तम संस्कार एका दिवसात घडत नाहीत त्याला काही काळ जावा लागतो आणि तो काळ चांगल्या विचारांच्या, आचारांच्या ,व्यक्तींच्या, परिस्थितीचा असावा लागतो.
उत्तम फुललेलं झाड पूर्णत्वास येण्यासाठी जशी पोषक जमीन ,पोषक हवामान, योग्य तितक्या पाण्याची आवश्यकता असते .
तसेच उत्तम व्यक्तिमत्व यासाठी सुद्धा उत्तम वातावरणाची आवश्यकता असते.
कुठल्याही कर्तृत्वसंपन्न व्यक्तीच्या आयुष्याचा मागोवा जर आपण घेतला तर या सर्व गोष्टी आपल्याला प्रकर्षाने दिसून येतात .
कर्तृत्वसंपन्न व्यक्ती नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करते, संकटावर मात करते, संघर्षावर मात करते, अपयशातून बोध घेते आणि या सर्व अनुभवाच्या शिदोरीवर ती आपली यशाची वाटचाल करते.
आम्ही नेहमी कर्तृत्वसंपन्न व्यक्तीची मुलाखत घेत असतो .असेच अतिशय अल्प काळात नावारूपाला आलेले ,
( शब्दांकन- ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे )
- महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे: डॉ. ज्योती मेहता
- ‘ धामणेत टाळ, विणा, मृदुगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष ‘
- इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बेबीताई बैकर बिनविरोध
- कामशेतला महिला मेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात
- सुरेल गीतांनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार



