नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये अंतिम वर्षाच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.सपली, संशोधन अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, प्रथम वर्ष शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शेखर रहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. जहागीरदार विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले की, ‘पुढील अगामी काळात तुमच्या क्षेत्रात काम करत असताना अचुकता आणि कौशल्य यांची सांगड घालून स्वतःला सादर करा. आपले महाविद्यालयासोबत इथून पुढे कायम जोडलेले रहा  ’.
डॉ. संपली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनानंतर देखील एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले.

तसेच भविष्यात देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाविद्यालय कायम उभे राहील अशी ग्वाही दिली.डॉ. देवतारे यांनी उद्योजकता आणि कौशल्य याचे महत्त्व विशद केले तर डॉ. धवस यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मिस्टर एनएमआयईटी आणि मिसेस एनएमआयईटी आणि इतर बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा तनपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शंकरराव उगले यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्पंदन वाघमारे, प्रा. राहुल पाटील, प्रा. भाग्यश्री वऱ्हाडे, प्रा. सागर देशपांडे, प्रा. सोनाली डोंगरे, प्रा. हेमलता माने, प्रा. रुपाली काळडोके तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरुष कुकडे, आस्था भोळे, सौरभ पाटेकर, वरुण देशमुख यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!