पायी दिंडी साठी पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी

पुणे: आषाढी वारी पायी चालणाऱ्या दिंड्यांसाठी  चालकसाठी पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ द्या तसेच सर्व वारकऱ्यांना भजनी मंडळींना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केली आहे राष्ट्र जन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.


पालखी दिंडी चालक मालक  वारकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी  जिल्हाअधिकारी रघुनाथ गावडे  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजितद पवार ,उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांना दिले आहे.
आषाढी वारीसाठी पालखी सोहळा महाराष्ट्रातल्या सर्व  पालखी दिंड्यांना व दिंडी चालकांना आर्थिक मदत 20000 ऐवजी 50 हजार तरी देण्यात यावं वाढ करण्यात यावी.पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना अपघाती विमा व आरोग्यासाठी आर्थिक मदत वाढ करून देणे,वारकरी कलावंत व सर्व भजनी मंडळींना आर्थिक मानधन लागू करणे व तात्काळ  अशी मागणी आहे.


वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजान फाउंडेशन परभणी च्या वतीने वरील विषय अनुसरून आषाढी वारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पाऊले चालती पंढरीची वाट पालखी सोहळा 2025 च्या औचित्य साधून आषाढी एकादशी निमित्त सर्वजण आळंदी देहू पैठण नरसिंह नामदेव मुक्ताईनगर शेगाव अक्कलकोट जेजुरी तुळजापूर अनेक संतांच्या दिंड्या  जात आहे.


आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात पायाने या पायी चालणाऱ्या दिंडी चालकांना दिंडीचा व आपल्या पालख्यांचा शासनाकडून काही ना काहीतरी आर्थिक मदत मिळावी म्हणून गेल्या वर्षीपासून वीस हजार रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे पण या वीस हजारावर उपायाच्या अनुदानामध्ये काहीच भागत नाही म्हणून राज्य शासनाने पन्नास हजार रुपये तरी अनुदान देण्यात यावं तसेच पायी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांना अपघाती विमा व आरोग्यासाठी लागणारे साहित्य साठी आर्थिक मदत तिचे अनुदान जास्त वाढ करून देण्यात यावे.

आणि महाराष्ट्रातल्या वारकरी कलावंत भजन करी टाळकरी कीर्तनकार महाराज मंडळी विणेकरी भालदार चोपदार मृदंग वादक तबलावादक पखवाद वादक गायनाचार्य भागवताचार्य सर्व संत मंडळींना वारकऱ्यांना सर्वांना आर्थिक मदत मानधन अनुदान एक महिन्याचे का होईना सरसकट देण्यात यावा वयाची आत्मा पाहता प्रत्येकाच्या खात्यावर आर्थिक मदत करण्यात यावा तसेच पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी सेवा गौरव पुरस्काराने प्रत्येक दिंडींचा सन्मान करण्यात यावा अशा अनेक मागण्या मागील वर्ष सुद्धा केल्या होत्या याहीवर्षी बऱ्याच जणांचे यावर्षी सुद्धा गेल्या वर्षी पैसे मिळाले नाही यावर्षी पूर्ण राहिल्यासगट सरसकट दिंडी चालकांना पैसे अनुदान देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.


वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर,प्रदेशाध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ परभणी महाराष्ट्र त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर संस्थापक अध्यक्ष राष्ट्र जन फाउंडेशन परभणी प्रदेशाध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य) यांनी पत्रका  द्वारे माहिती दिली.

या विषयी महाराष्ट्र वारकरी आर्थिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री ,महाराष्ट्र राज्याचे सर्व विरोधी पक्ष नेते ,महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी ,महाराष्ट्राचे सर्व आमदार ,महाराष्ट्राचे सर्व खासदार,महाराष्ट्रातील सर्व शासकीय महामंडळ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!