मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन

वडगाव मावळ: भात पिकासह अन्य पिकांचा पीकविमा काढण्यात यावा, अशी मागणी मावळ शिवसेनेनी केली आहे.तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मावळचे कृषी अधिकारी यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ मधील भात पीक व इतर पीक लागवड सुरू आहे. मावळ तालुका हा भात लागवडी साठी प्रसिद्ध आहे तरी यंदा पावसाळा लवकर सुरु झाल्याने भात लागवडी ची रोपे कमी प्रमाणात उगवली आहे तरी गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा किती भात पिकांचे व इतर पिका चे नुकसान किती प्रमाणात झाले व किती हेक्टर वर भात मलागवत होणार आहे यांची आकडेवारी जाहीर करावी.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा किती शेतकऱ्यांनी काढलं आहे किंवा पी डी सी सी बँक मार्फत शेतकरी पीक कर्ज घेतात तेव्हा त्यांचा पीक विमा किती शेतकरी यांचा स्थानिक सोसायटी च्या मार्फत बँक नी उतरलं आहे आशी आकडेवारी आपण जाहीर करून ज्या शेतकऱ्यांन चे या बाबत नुकसान झाले आहे व त्याच्या कडे पीक विमा आहे त्याना नुकसान भरपाई पासून वंचित ठेऊ नये तरी आपण या बाबत योग्य ती उचित कारवाई लवकरात लवकर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!