पिंपरी:
पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियानात
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर,आदर्श बालक मंदिर शिवनगरी,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी पुढाकार घेतला आहे.
बिजलीनगर, शिवनगरी ,दगडोबा चौक परिसरातुन जनजागृती अभियान राबविण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड आणि मिनाक्षी मेरुकर यांनी विद्यार्थांना व नागरिकांना पर्यावरणपुरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याचे मार्गदर्शन केले.
यामध्ये सजावटीसाठी प्लॕस्टीकचा वापर टाळा,थर्माकोलचा वापर टाळा,प्लॕस्टर आॕफ पॕरिसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत अशा मुर्ती घेऊ नका,शक्यतो शाडू मातीच्याच मुर्ती बसवाव्यात,गणेशमुर्ती लहान आकाराची घ्यावी.गणपती विसर्जन घरच्याघरी करावे कापडी पिशवीचा वापर करा,गणपतीदान उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
यावेळी पर्यावरणाचे महत्त्व संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी नागरिकांना  सांगितले या अभियानाचे संयोजन शाळेचे  मुख्याध्यापक:-विनोद मुळके
शिक्षक:- विद्या काळे, प्रदीप नागरगोजे, आनंद कुमदाळे, माधुरी कुंजीर, सरला पाटील, पुनम गवते यांनी संध्या स्वामी,जयवंत सुर्यवंशी यांनी केले होते.परिसरातुन ५०० नागरिकांनी संस्कार प्रतिष्ठानच्या व विद्यार्थांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!