
टाकवे बुद्रुक:
वादळी वा-याने आंदर मावळातील कळकराईच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले आहे. एकावर्ग खोलीचे एका बाजूच्या छतांचे पत्रे उडून गेले आहे .
प्रशासनाने याची दाखल घेऊन शाळा सुरु होण्यापुर्वी शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी कळकराई ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळात शाळेचे पत्रे उडाले, अँगल तुटून पडलेत. पावसामुळे वर्गखोलीतील साहित्याची नुकसान होऊ शकते,याची दखल घेत शाळा दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करावे अशी ग्रा.प सदस्य , भरत साबळे, सचिन तळपे आणि ग्रामस्थ आणि तरूण मंडळाने केली आहे.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार



